Pages
- Home
- Online Test निर्मिती
- नवोपक्रमाची यादी
- ज्ञानरचनावादी साहित्य यादी
- YouTube महत्वाची सेटिंग
- PPT कशी बनवावी
- Computer वर Andriod App वापरणे
- Computer स्लो चालत असल्यास
- ISO मानांकन निकष
- ऑफलाईन अँप निर्मिती
- कम्प्यूटर विंडोस कीबोर्ड शॉर्टकट्स
- रजेविषयी माहिती
- बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक
- महत्वाच्या pdf
- बदली महत्वाचे
- सातत्यपूर्ण मूल्यमापन श्रेणी
- Gr
- पायाभूत चाचणी शेकडेवारी कशी काढावी
- वजाबाकी करण्याची एक ट्रिक : ____ अनेकवेळा दुकानात...
- शिष्यवृत्ती माहिती
- शाळा सिध्दी रिपोर्ट
- शैक्षणिक उपक्रम
- बोधकथा
- गुगल फॉर्म तयार करणे
- 100%वाचन क्षमता कार्यक्रम
- महाराष्ट्रातील किल्ले
बोधकथा
महाराष्ट्रातील किल्ले
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ ☀ *सिंहगड*☀ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
*_गड आला पण सिंह गेला...._*
४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.
📜 *इतिहास:*
_किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत होता._
_सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले *‘गड आला पण सिंह गेला.’* माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले._
🔘 *गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :*
◈ *दारूचे कोठार :* दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
◈ *टिळक बंगला :* रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
◈ *कोंढणेश्वर :* हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
◈ *श्री अमृतेश्वर भैरव मंदिर :* कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मुर्त्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
◈ *देवटाके :* तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
◈ *कल्याण दरवाजा :* गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
◈ *उदेभानाचे स्मारक :* दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.
◈ *झुंजार बुरूज :* झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
◈ *डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा :* झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
◈ *राजाराम स्मारक :* राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाव्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
◈ *तानाजीचे स्मारक :* अमृतेश्वराच्या मागच्या बाजूनेवर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी _माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो._
🎯 *गडावर जाण्याच्या वाटा :*
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक नागेश्वरमार्गे आणि दुसरा थेट वासोट्याकडे.
पुणे-कोंढणपूर : पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.
पुणे दरवाजा : पुणे-सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.
🏠 *राहण्याची सोय:* गडावर राहाण्याची नाही.
🍲 *जेवणाची सोय:*
गडावर छोट्या हॉटेल्समध्ये जेवणाची सोय होते.
🗑 *पाण्याची सोय:*
देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी बारामहिने पुरते.
⌚ *जाण्यासाठी लागणारा वेळ:*
गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.
═════════════════
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ ☀ *सिंधुदुर्ग*☀ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
🌎 *भौगोलिक स्थान:*➨
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले.
_*भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.*_
📌 *महत्त्व:*➨
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे _दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत._या किल्ल्यामध्ये महाराश्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे.याची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती.
📜 *इतिहास:*➨
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली.
असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
_चौर्याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।_
🔘 *पहाण्याची ठिकाणे:*➨
सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत.
गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. _सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले._ या किल्ल्यावर _२८२ फूट उंचीचा भगवा ध्वज इ.स. १८१२ पर्यंत फडकत होता._ इ.स. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती करून घेतली.
🗑 *पाण्याची सोय:* ➨
मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. त्यांची नावे दुध विहीर , दही विहीर आणि साखर विहीर. अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. यामुळे किल्ल्यावर रहाणे सुलभ झाले आहे. तिथे पिण्याच्या पाण्यासाठी त्यावेळी तीन विहीरींचे बांधकाम केलेले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो.
*सिंधुदुर्ग चा नकाशा उपलब्ध आहे*
═════════════════
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ ☀ *पन्हाळगड*☀ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
_पन्हाळगड किल्ला ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे._
_कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो._
_महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांना अनन्या साधारण महत्त्व आहे. त्यांच्या कारकिर्दीतील करे सोबती म्हणजे अजिंक्य आणि बेलाग किल्ले. शिवरायंच्या जीवातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले *पन्हाळगड*._
📜 *इतिहास :-*
हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव _‘पन्नग्नालय’_ अफजलवधा नंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८ नोव्हेंबर १६५९ ला घेतला. किल्ला विजापुररांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिद्धी जौहरचा वेढा पडला. १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
🔘 *गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :-*
*१. राजवाडा:–* हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज याट नगरपालिका कार्यालय पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बाईज होस्टेल आहे.
*२. सज्जाकोठी :–* राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पहाण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.
*३. राजदिंडी :–* ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिद्धी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
*४. अंबारखाना :-* अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारूगोळा आणि टाकसाळ वैगरे होती.
*५. चार दरवाजा :-* हा पूर्वकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स. १८४४ मध्ये हा इंग्रजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्ल्क आहेत. येथेच ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.
*६. सोमाळे तलाव :-* गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.
*७. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी :-* सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
*८. रेडे महाल :-* याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
*९. संभाजी मंदिर :-* त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
*१०. धर्मकोठी :-* संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते. ती धर्मकोठी . सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
*११. अंदरबाव :-* तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. तर मधला त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
*१२. महालक्ष्मी मंदिर :-* राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. _राजा गंडारित्य भोज_ याचे हे कुलदैवत होय.
*१३ तीन दरवाजा :-* हा पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स. १६७६ मध्ये कोंडाजी फर्जदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.
*बाजीप्रभुंचा पुतळा :-* एस.टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभु देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.
🌀 *गडावर जाण्याच्या वाटा :-*
*१. चार दरवाजा मार्गे :-* कोल्हापूर शहरातून एस.टी बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करत.
*२. तीन दरवाजा मार्गे :-* गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.
🏠 *राहाण्याची सोय:-*किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने हॉटेल्स आहेत.
🍲 *जेवणाची सोय:-* निवासस्थानांमध्ये जेवणाची सोय होते.
🗑 *पिण्याचे पाणी:-*किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
⌚ *लागणारा वेळ:-*
किल्ल्यावर जाण्यासाठी कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी सर्व ऋतु उत्तम आहेत.
═════════════════
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ ☀ *लोहगड* ☀ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
_हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो._
पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील मळवली स्थानकापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. रेल्वेस्थानकाच्या फलाटावर लोहगड विसापूर या जोडकिल्ल्यांची रेल्वेने मुळी पाटी लावून जाहिरातच केलेली आहे. त्यावर लिहिलयं -“लोहगड, विसापूर फोर्ट-किल्ले”
मळवली स्थानकबाहेर पडल्यानंतर नव्या द्रुतगती महामार्गावरील पुल ओलांडून पलिकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर भाजे गाव येते. येथून एक पायऱ्यांचा मार्ग भाग्याच्या लेण्यांकडे जातो. तर दुसरी गाडीवाट लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोहगावाकडे जाते. लोहगावातून लोहगडाची तटबंदी आणि बुरूज लक्ष वेधून घेतात. चढायला सोपा असा हा दुर्ग सहजपणे काबीज करता येतो. गडावर एक सुंदर स्वच्छ पाण्याचे टाके आहे. यात रंगीबेरंगी मासेही आहेत.
पवणामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे-मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळीची नेहमीच ये जा चालू असते. *किल्ल्याच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिद्ध लेण्या आहेत.* मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.
📜 *इतिहास :*➨
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. *_सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या_*. इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इ.स. _१६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला._पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती.
इ.स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला. शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुऱ्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
🔘 *गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :*➨
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.
✦ *गणेश दरवाजा :* ह्याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
✦ *नारायण दरवाजा :* हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.
✦ *हनुमान दरवाजा :* हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
✦ *महादरवाजा :* हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.
महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभ उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. ते तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळं सोळाकोनी आहे.
मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस _विंचूकाटा_ म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजुच्या परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात. पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोमनी गुणगुणतं.. _ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी । आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥_
🌀 *गडावर जाण्याच्या वाटा :*➨
लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणाऱ्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे. त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.
लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून ३ ते ४ कि.मी अंतरावर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सीने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु. आहे.
काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.
🏠 *राहण्याची सोय:*➨
लक्ष्मी कोठी रहाण्याची एकमेव सोय आहे. ३० ते ४० जण आरामात राहू शकतात.
🍲 *जेवणाची सोय:*➨
आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.
🗑 *पाण्याची सोय:*➨
बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.
⌚ *वेळ:*➨
गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.
═════════════════
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ *महिपालगड* ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
✦ *किल्ल्याची ऊंची:* ३२२० फुट
✦ *किल्ल्याचा प्रकार:* गिरीदुर्ग
✦ *श्रेणी:* मध्यम
✦ *जिल्हा:* कोल्हापूर
_प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही._
🔘 *पहाण्याची ठिकाणे :*➤
बेळगावहून ४५ मिनिटामध्ये आपण गडपायथ्याच्या देवरवाडी गावात पोहचतो. या गावातून गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढल्यानंतर आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर संकुलात पोहचतो. श्री गुरु चरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख आहे. मंदिरासमोर सुंदर नंदी आहे. गाभार्यात भव्य शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे. ही आरोग्य भवानी अष्टभूजा आहे. दोन्ही मंदिरे हेमाडपंथी शैलीत आहेत. मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक व घाटदार आहेत. मंदिराच्या मागे चवदार पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले पवित्र कुंड आहे.वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागून डांबरी सडकेने आपण महिपालगडाकडे निघायचे. या मार्गावरुन जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. आत प्रवेश करण्यासाठी प्रखर विजेरी आवश्यक आहे, कारण या भुयारातून पाणी भरलेले आहे. या कातळाच्या वर असलेल्या पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो.या पठाराच्या उजव्या बाजूने जाणार्या डांबरी सडकेने आपण गडावरील वस्तीवर पोहचायचे. गडावरील वस्ती सुरु होण्यापूर्वी आपणास उध्वस्त तटंबदी, प्रवेशद्वाराचे अवशेष व शिळा दिसतात. गावकरी त्यांना गौळ देव म्हणतात. पुढे शिवरायांचा आश्वारुढ पुतळा दिसतो, येथून पुढे गडाची मुख्य तटबंदी सुरु होते. वस्तीच्या मधून जाणार्या सडकेने पुढे गेल्यावर आपणास बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. यावर गणेशाचे सुंदर शिल्प आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या तटबंदीने हा भाग माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या बाजूस कातळात खोदलेली प्रचंड विहिर लागते. तिची लांबी ७० फूट व रुंदी ४० फूट आहे. तिची खोली किती आहे, याच अंदाज कोणालाच नाही. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. ही विहिर पाहून आपण विहिरीच्या मागे असलेल्या अंबाबाई मंदिरात जायचे. उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपणांस सुस्थितीतील निशाण बुरुज लागतो. त्यावर चढण्यास पायर्या आहेत. बुरुजाशेजारीच श्री महादेवाचे मंदिर आहे. तटबंदी आपल्या उजव्या हातास ठेवून आपण गडाचे दुसरे टोक गाठायचे. तटातून खाली उतरणार्या वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली कोठारे दिसतात. परत मागे फिरल्यावर आपणास ढासळलेला दरवाजा दिसतो. त्याचे बुरुज मात्र चांगल्या अवस्थेत आहेत. गडावरील प्रत्येक घरासमोर आपणास इतिहासकाळातील पाणी भरुन ठेवलेली दगडी भांडी दिसतात. गडावरील लोकांना गडाविषयी अभिमान आहे.
🎯 *पोहोचण्याच्या वाटा:*➤
महिपाल गडातच मोठे गाव वसलेले आहे. त्याचे नावच ‘महिपालगड’ असे आहे. महिपालगड जरी कोल्हापूर जिल्हयात येत असला, तरी तिथे जाण्यासाठी बेळगाव गाठायचे. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे देवरवाडी गावात जायचे. देवरवाडीतून वैजनाथमहिपाल गाव ६ किमी वरच आहे. किल्ल्यातून गाडीरस्ता गेलेला आहे.
🏠 *राहाण्याची सोय:*➤
गडावर निवासाची व्यवस्था आहे.
🍲 *जेवणाची सोय:*➤
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
🗑 *पाण्याची सोय:*➤
गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.
⌚ *पाहण्यासाठी लागणारा वेळ:*➤
गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे २ तास लागतात.
═════════════════
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
••●🇲 🕳🇸🕳🇵●••
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ ☀ *सोनगिर*☀ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
➤ _महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे. या दगडांच्या देशातच सह्याद्रीचा उगम झाला आहे. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अनेक गडकिल्ले वसलेले आहेत. या सह्याद्रीची एक रांग धुळे जिल्ह्यात गेलेली आहे. हा किल्ला धुळे जिल्ह्यात येत असून याची उंची 1000 फुट इतकी आहे व हा गिरीदुर्ग प्रकारात येतो.या सह्याद्रीच्या रांगेत धुळे - आग्रा महामार्गावर दोन किल्ले आहेत. त्यांची नावे सोनगिर आणि लळींग. यापैकी सोनगिर हा धुळ्या पासून २१ कि.मी अंतरावर आहे._
🔘 *पहाण्याची ठिकाणे :*➠
➤ _सोनगिर किल्ला लहानशा टेकडीवर वसलेला आहे. गावातून किल्ल्यावर जातांना एक उध्वस्त प्रवेशव्दार लागते. सध्या या प्रवेशव्दाराची चौकट शिल्लक आहे. बाकी सर्व भाग पडून गेला आहे. या प्रवेशव्दाराच्या कमानीवर एक शिलालेख होता, मात्र आज तो धुळ्याच्या राजवाडे संशोधन केन्द्रात ठेवला आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच एक पायर्यांचा रस्ता कातळातून वर गेलेला दिसतो. प्रवेशव्दाराच्या आजुबाजुला अनेक खाबांचे अवशेष पडलेले दिसतात. थोडेसे खाली उतरल्यावर एक पाण्याचे टाके दिसते. कातळातील पायर्या चढून वर गेले की, आपण गडमाथ्यावर पोहोचतो. येथून गड फिरण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एक उजवीकडचा तर दुसरा डावीकडचा, आपण डावीकडे वळायचे. गडाच्या या बाजूला काहीच अवशेष नाहीत. शेवटच्या टोकावर तटबंदीचे अवशेष आहेत. हा सर्व भाग पाहून पुन्हा कातळातील पायर्यांपाशी यावे. येथून उजवीकडची वाट धरावी. येथून थोडे पूढे गेल्यावर एक बाव (विहीर) लागते. खरे तर याला बावं म्हणणे चुकीचेच आहे, कारण आत कितीही डोकावले तरी तळाकडील पाणी काही दिसत नाही, याची खोली ही दहामजली इमारती एवढी असावी. याच्याच थोडेसे पुढे पुष्करणीचा हौद लागतो. पूर्वी या विहीरीतून पाणी काढून या हौदात साठविले जात असे. या पुष्कर्णीचे सध्या १४ कोनाडे शिल्लक आहेत. थोडे अंतर गेल्यावर किल्ल्यावरील वाड्यांचे काही अवशेष दिसतात. किल्ल्याच्या शेवटच्या टोकाशी बुरुजांचे काही अवशेष दिसतात. सध्या किल्ल्याचे बांधकाम बरेच ढासळलेले आहे. किल्ला मात्र अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बांधला आहे. प्राचीन सुरत - बुर्हाणपूर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती._
🌀 *पोहोचण्याच्या वाटा :*➠
सोनगिर किल्ला हा धुळ्यापासून २१ किमी अंतरावर आहे. धुळे - आग्रा रस्त्यावर सोनगिर नावाचा फाटा लागतो. या फाट्यावरच सोनगिर नावाचे गाव आहे. धुळेहून शिरपूर मार्गे जाणार्या किंवा शहादा, धोंधाईचा अशा कोणत्याही मार्गाने जाणार्या एसटीने सोनगिर फाट्यावर उतरावे. या फाट्यावरुन साधारण १० मिनिटात सोनगिर गावात पोहोचायचे. गावातून ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोरुनच एक छोटीशी वाट गडावर जाते. सोनगिर गावातून गडावर जाण्यास १० मिनिटे लागतात. गडावर जाणारी ही एकमेव वाट आहे.
🏠 *राहाण्याची सोय :*➠
गडावर राहण्याची सोय नाही.
🍲 *जेवणाची सोय :*➠
सोनगिर फाट्यावर काही हॉटेल्स आहेत, तेथे जेवणाची सोय होऊ शकते.
🗑 *पाण्याची सोय :*➠
गडावर पिण्याचे पाणी नाही. आपण स्वतः सोबत बाळगावे.
⌚ *जाण्यासाठी लागणारा वेळ :*➠
सोनगिर गावातून १० मिनीटे लागतात.
═════════════════
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ ☀ *वेताळगड*☀ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
➤ _औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात *वेताळगड उर्फ वसईचा किल्ला* या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्याची उंची 1900 फुट असून हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परीपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली *रुद्रेश्वर* लेणीही पहाण्यासारखी आहेत._
🔘 *पहाण्याची ठिकाणे :*➠
➤ वेताळगड किल्ल्याच्या एका बाजूला हळदा घाट रस्ता झाल्यामुळे या मार्गाने आपण जवळ जवळ किल्ल्याच्या प्रवेशव्दारात पोहोचतो. प्रथम दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. त्यांच्या मागे या दोन बुरुजां पेक्षा उंच व भव्य बुरुज आहे. त्याला नक्षीदार सज्जा आहे. दरवाजा पर्यंत पोहोचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली आहे. दोन बुरुजांमधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख प्रवेशव्दाराकडे जाते. या प्रवेशव्दाराचे तोंड जंजाळा किल्ल्याकडे असल्यामुळे याला *"जंजाळा दरवाजा"* म्हणत असावेत. दरवाजाची उंची २० फूट असून त्याच्या दोन बाजूस शरभ शिल्प कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जीना आहे. या जीन्याने वर गेल्यावर दरवाजाच्या छतावर एक चौकोनी खाच केलेली आहे. त्यातून उतरणारा जीना आपल्याला एका मोठ्या खोलीत घेऊन जातो. दरवाजावर उभे राहील्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी, त्या खालचा हळदा घाट व सर्वात खाली *वेताळवाडी धरण* पहायला मिळते. तर वरच्या बाजूला बालेकिल्ल्याची तटबंदी पहायला मिळते.
प्रवेशव्दारावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक कोरडे खांब टाके लागते. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन तटबंदी उजव्या हाताला ठेऊन चालू लागल्यावर उजव्या बाजूस भव्य बुरुजात जाण्याचा प्रवेश मार्ग दिसतो. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघळे असल्यामुळे आत शिरता येत नाही. थोड पुढे गेल्यावर आपण तटबंदीतील पूर्व टोकाच्या बुरुजापाशी पोहोचतो. येथून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर आपण ५ मिनिटात बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ एक छोटी घुमट असलेली इमारत आहे. या इमारतीच्या छ्ताला एक झरोका आहे. येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेल तुपाचे टाक पहायला मिळत. या टाक्याच्या बाजूला धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारत आहे. पुढे गेल्याव्रर *नमाजगीर* नावाची मस्जिद आहे. त्याच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह व त्याखाली क्रॉस कोरलेला आहे. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर आहे. नमाजगीरच्या समोर तलाव आहे.
किल्ल्याच्या उत्तर टोकावर *बारदरी* नावाची २ कमान असलेली इमारत दुरुन नजरेत भरते. या इमारतीकडे जातांना डाव्या बाजूला एक इमारत आहे. बारादरी ही किल्ल्याच्या उत्तर टोकाला आहे. या इमारतीत २ कमानींच्या दोन रांगा आहेत. राजघराण्यातील लोकांना उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी अशी इमारत देवगिरी किल्ल्यावरही बांधलेली आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याचा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.
किल्ल्याच्या मुख्या दरवाजाकडे जाण्यासाठी बारादरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे पुढे ही वाट बारादरी खालून उतरत खाली जाते. येथे एक बुजलेले टाके आहे. त्याच्या बाजूला ६ फूट १० इंच लांबीची तोफ आहे. उजव्या बाजूच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. दोन बुरुजात बसवलेले किल्लाचे मुख्य प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. प्रवेशव्दार २० फूट उंच असून त्याच्या दोनही बाजूला शरभ शिल्प कोरलेली आहेत. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. दुसरे प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख आहे. हे प्रवेशव्दार पाहीले की आपली गड फेरी पूर्ण होते. येथून २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो.
❑ *रुद्रेश्वर लेणी :*➠
वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात रुद्रेश्वर लेणी आहेत. ही हिंदू लेणी असून यात नरसिंह, गणेश, भैरव व सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. याशिवाय लेण्यात शिवलिंग व नंदी आहे. वेताळवाडीतून रुद्रेश्वर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
🌀 *पोहोचण्याच्या वाटा :*➠
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी गडावर जाता येते.
*☞ १)* औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्लासुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.
*☞ २)* औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
*☞ स्वत:चे वहान नसल्यास पायी गड चढण्यासाठी:*➠
औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
🏠 *राहाण्याची सोय :*➠
गडावर रहाण्याची सोय नाही.
🍲 *जेवणाची सोय :*➠
जेवणाची सोय गडावर नाही, सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.
🗑 *पाण्याची सोय :*➠
गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. पाणी सोबत बाळगावे.
⌚ *जाण्यासाठी लागणारा वेळ :*➠
*१)* वेताळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी ४५ मिनीटे लागतात.
*२)* हळदा घाट रस्त्यावरून गडावर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात.
═════════════════
🚩
▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂
╭════════════╮
▌ ☀ *रतनगड*☀ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
_अहमदनगर जिल्ह्यात घनचक्कर रांगेत, प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची उंची 4300 फुट इतकी आहे. भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदर्याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरन्य परिसर आहे._
🔘 *इतिहास:➨*
रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावं आहे. या रतनवाडीतच अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. अमृतेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी आहे. साधारण १२०० वर्षा पूर्वीचे हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशास्त्राची ओळख करुन देते.
रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे रागूर व अलंग हे घाटमाथ्यावरचे अन् सोकुलीवाडी हा कोकणातला महाल या गडाच्या अधिपत्याखाली होते.
🔘 *पहाण्याची ठिकाणे:➨*
रतनगडावर जाण्याअगोदर पायथ्याशी रतनवाडीत असणारे *अमृतेश्वराचे मंदिर* पाहावे. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम आढळते. यामध्ये यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या बाजुलाच प्रशस्त अशी *पुष्करणी* आहे, यालाच विष्णुतीर्थ असे म्हणतात. यात विविध प्रकारच्या मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मूर्त्या आहेत. अमृतेश्वराच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे एक मंदिर नाणेमावळ प्रांतात आढळून येते. किल्ले चावंडजवळील कुकडी नदीच्या उगमापाशी असणारे कुकडेश्वर मंदिर व किल्ले चावंडवरील पुष्करणी हे समकालीन असावेत. शिडीच्या मार्गाने गडावर जातांना प्रवरा नदीचे पात्र आपणा बरोबरच धावत असते. हा रस्ता घनदाट जंगलातून जाणारा आहे. साधारण दुसर्या पठारावर आल्यावर डावीकडे सरळ जाणारी वाट हरिश्चंद्रगडाकडे घेऊन जाते, तर समोरच्या वाटेने शिडी चढून गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडची वाट गुहांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट गडाच्या दुसर्या दरवाजाकडे जाते, दुसर्या दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेतील गोल बुरुज दिसतो, येथेच पाण्याची दोन ते तीन टाके आहेत, येथून थोडे पुढे गेल्यावर वाटेत इमारतीचे अवशेष आढळतात. साधारणत: १० मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील कोकण दरवाजा लागतो, दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. या वाटेने उतरणे धोकादायक आहे. येथून पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. पुढे आणखी थोडे गेल्यावर अनेक टाक्यांची रांगची रांग आढळते. याच मार्गाने पुढे गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते. नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो. डावीकडे खाली चांगल्या स्थितीतील दरवाजा आहे. ३० ते ४० कातळात कोरलेल्या पायर्याही आहेत. संपूर्ण दरवाजा कातळात कोरलेला आहे. दरवाज्यातून खुट्टा सुळक्याचे दर्शन घडते. नेढ्याच्या दुसर्या बाजुने उतरल्यावर अर्ध्या तासावरच प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. संपूर्ण गड पाहण्यास दोन तास लागतात.
🌀 *पोहोचण्याच्या वाटा:➨*
*१) रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून :-*
एक वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. ही वाट सोपी आहे.
*२) शिडीची वाट :-*
ही वाट गडाच्या डावीकडून जाते. या वाटेने गडावर जातांना दोन शिड्या लागतात. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.
🏠 *राहाण्याची सोय:➨*
शिडीच्या वाटेने वर चढल्यावर पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजूस तीन गुहा आहेत. यात ७० ते ७५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
🍲 *जेवणाची सोय:➨*
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
🗑 *पाण्याची सोय:➨*
गडावर बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
⌚ *जाण्यासाठी लागणारा वेळ:➨*
शिडीच्या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.
*✦ गडाचा नकाशा उपलब्ध आहे.*
═════════════════
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment